51 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू
आतापर्यंत 20,809 बाधित झाले बरे
उपचार घेत असलेले बाधित 692
चंद्रपूर, दि. 20 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर पुन्हा 51 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 852 वर पोहोचली आहे.
तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 809 झाली आहे.
सध्या 692 बाधितांवर उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 64 हजार 824 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 40 हजार 837 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये गाडगेनगर वरोरा येथील 69 वर्षीय पुरूष,
गजानन महाराज चौक, चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला व
घुग्गुस येथील 83 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 351 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 324, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 51 रुग्णांमध्ये
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 19,
चंद्रपूर तालुक्यातील चार,
बल्लारपुर तीन,
भद्रावती पाच,
ब्रम्हपुरी एक,
नागभीड एक,
मूल एक,
पोंभूर्णा एक,
राजूरा सहा,
चिमुर दोन,
वरोरा चार,
कोरपना दोन व
इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.