धोका वाढला! महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासात 6971 कोरोना पॉझिटिव्ह , 35 जणांचा मृत्यू #Covid-19Maharashtra #कोरोनामहाराष्ट्र

धोका वाढला! महाराष्ट्र  राज्यात मागील 24 तासात 6971 कोरोना पॉझिटिव्ह सापडले

35 जणांचा मृत्यू

मुंबई, 21 फेब्रूवारी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने विशेष लक्ष घातलं आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता पुढील 15 दिवस महत्त्वाचे असल्याचं प्रशासनाने सांगितलं. रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या शोधावर भर देण्यात येत आहे. तसेच प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे राज्यात कोरोनाचे रुग्णसुद्धा वाढत आहेत.

महाराष्ट्र राज्यात गेल्या 24 तासांत 6971 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासांत 2417 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आज 35 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत एकूण 21,00,884 रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 51788 रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच राज्यात आतापर्यंत 19,94,947 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या राज्यात 52,956 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागानं दिली आहे.

नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट झाला आहे. गेल्या 24 तासात 725 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल पाच महिन्यानंतर सर्वाधिक 9443 चाचण्या झाल्या. त्यापैकी 725 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. पॉझिटीव्ह येण्याचं प्रमाण सध्या 7.67 टक्के इतक्यावर पोहोचला आहे. तर 6 जणांचा मृत्यू .

महाराष्ट्र राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजपासून राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही हा निर्णय जनतेने घ्यावा, असंही नमूद केलं. लॉकडाऊन करायचा नसेल तर मास्क वापरा आणि नियम पाळा. अन्यथा 8 दिवसानंतर लॉकडाऊनवर निर्णय घ्यावा लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.