गत 24 तासात चंद्रपुर जिल्हा कोरोना1064 कोरोनामुक्त, #corona

गत 24 तासात चंद्रपुर जिल्हा कोरोना

1064  कोरोनामुक्त,

1741 पॉझिटिव्ह 

 29 मृत्यू

 आतापर्यंत 41,408 जणांची कोरोनावर मात

ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,360

चंद्रपूर, दि. 29 एप्रिल : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 1064 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1741 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 29 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 58 हजार 645 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 41 हजार 408  झाली आहे. सध्या 16 हजार 360  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 73 हजार 004  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 9 हजार 565 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 63 वर्षीय पुरुष, 53, 60  व 68 वर्षीय पुरुष,
 चंद्रपुर लालपेठ कॉलनी परिसरातील 50 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर बाबुपेठ येथील 45, 55  व  67 वर्षीय महिला, 
चंद्रपुर रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, चंद्रपुर अरविंद नगर येथील 84 वर्षीय महिला, चंद्रपुर सरकार नगर येथील 50 वर्षीय पुरुष, 
 वरोरा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, 
वायगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 70 व 87 वर्षीय पुरुष,
बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला,
विसापूर येथील 60 वर्षीय महिला. 65 वर्षीय पुरुष,
कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, 
सिंदेवाही तालुक्यातील 50 ‌व 52 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, 
सरडपार येथील 65 वर्षीय महिला, 
आडेगाव येथील 43 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 49 व 57 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 68  वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 877 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 812, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1741 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 497, 
चंद्रपूर तालुका 142, 
बल्लारपूर 104, 
भद्रावती 106, 
ब्रम्हपुरी 121, 
नागभिड 39, 
सिंदेवाही 116, 
मूल 123, 
सावली 39, 
पोंभूर्णा 11, 
गोंडपिपरी 45, 
राजूरा 98, 
चिमूर 50, 
वरोरा 128, 
कोरपना 87,  
जिवती 15 
 व इतर ठिकाणच्या 20 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.