703 कोरोनामुक्त,
1728 पॉझिटिव्ह
34 मृत्यू
आतापर्यंत 36,415 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,637
चंद्रपूर, दि. 25 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 703 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1728 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 34 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 52 हजार 840 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 36 हजार 415 झाली आहे. सध्या 15 हजार 637 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 57 हजार 262 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 98 हजार 428 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये
चंद्रपूर शहरातील 35 वर्षीय पुरुष,
चंद्रपूर शहरातील 39 वर्षीय पुरुष,
चंद्रपूर शहरातील 41 वर्षीय पुरुष,
चंद्रपूर शहरातील 72 वर्षीय महिला,
चंद्रपूर शहरातील 55 वर्षीय महिला,
ऊर्जानगर येथील 46 वर्षीय पुरुष,
ताडाळी येथील 25 वर्षीय पुरुष,
चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 62 वर्षीय पुरुष,
चंद्रपूर शहरातील श्रीराम वार्ड येथील 75 वर्षीय महिला,
दुर्गापूर येथील 68 वर्षीय महिला,
घुगुस येथील 57 वर्षीय महिला,
वणी येथील 46 वर्षीय पुरुष
वणी 50 वर्षीय पुरुष,
जिवती येथील 56 वर्षीय पुरुष,
वरोरा येथील 40,वर्षीय पुरुष
वरोरा येथील 48, वर्षीय पुरुष
वरोरा येथील49,वर्षीय पुरुष
वरोरा येथील 60 वर्षीय पुरुष
वरोरा येथील 63 वर्षीय पुरुष,
शेगाव येथील 60 वर्षीय पुरुष,
बल्लारपूर येथील 64 वर्षीय दोन महिला,
बामणी येथील 47 वर्षीय महिला,
भद्रावती येथील 54 वर्षीय पुरुष,
चिमूर भिसी येथील 47,55 व 60 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष,
ब्रह्मपुरी येथील 60 वर्षीय पुरुष,
नागभीड येथील 55 व 65 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, तर
यवतमाळ येथील 71 वर्षीय महिलेचा व
आरमोरी गडचिरोली येथील 32 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 788 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 725, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 26, यवतमाळ 25, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 1728 रुग्णांमध्ये
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 512,
चंद्रपूर तालुका 74,
बल्लारपूर 106,
भद्रावती 86,
ब्रम्हपुरी 107,
नागभिड 109,
सिंदेवाही 77,
मूल 93,
सावली 13,
पोंभूर्णा 13,
गोंडपिपरी 28,
राजूरा 109,
चिमूर 51,
वरोरा 172,
कोरपना 150,
जिवती 11
व इतर ठिकाणच्या 17 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
0 0 0 0 0