गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक ,974 पॉझिटिव्ह ; 10 कोरोना बाधितन्चा मृत्यू, #ChandrapurUpdateCorona

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक 

354 कोरोनामुक्त 

974 पॉझिटिव्ह ; 

10 कोरोना बाधितन्चा मृत्यू,

 आतापर्यंत 28,113 जणांची कोरोनावर मात

 ॲक्टीव पॉझिटिव्ह 5888

चंद्रपूर, दि. 12 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 354 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, 

तर 974 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 10 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 34 हजार 503 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 28 हजार 113 झाली आहे. सध्या 5888 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

 आतापर्यंत 3 लाख 4 हजार 498 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 65 हजार 135 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
आंबेनेरी ता. चिमूर येथील 56 वर्षीय पुरुष, सोनेगाव बु. ता. चिमूर येथील 65 वर्षीय महिला, पिपर्डा ता. चिमूर येथील 50 वर्षीय महिला, 
चंद्रपूर शहराच्या सरकारनगर येथील 38 वर्षीय महिला, 
चंद्रपुर भिवापूर बंगाली कॉलनी येथील 58 वर्षीय महिला व 
चंद्रपुर जटपुरा गेट येथील 62 वर्षीय पुरुष, 
ब्रह्मपुरी येथील 45 वर्षीय पुरुष, 
गुरुमाऊली नगर वरोरा येथील 70 वर्षीय महिला, सलीमनगर, वरोरा येथील 63 वर्षीय पुरुष, बल्लारशा येथील 60 वर्षीय महिलेचा  
समावेश आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 502 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 458, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 974 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 309, 
चंद्रपूर तालुका 58,  
बल्लारपूर 10, 
भद्रावती 108, 
ब्रम्हपुरी 16, 
नागभिड 26, 
सिंदेवाही सहा, 
मूल 21, 
सावली 14, 
गोंडपिपरी 10, 
राजूरा 15, 
चिमूर 142, 
वरोरा 205, 
कोरपना 26 
व इतर ठिकाणच्या आठ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.