आज आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यु
640 नविन पॉझिटिव्ह ;
16 कोरोना बाधितन्चा मृत्यू
चंद्रपूर, दि. 10 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे,
तर 640 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.