गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 2126 कोरोनामुक्त, Chandrapur Corona

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 

2126 कोरोनामुक्त, 

1508 पॉझिटिव्ह 

15 मृत्यू

आतापर्यंत 50,805 जणांची कोरोनावर मात

ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,098

चंद्रपूर, दि. 6 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1508 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 67 हजार 939 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 50 हजार 805 झाली आहे. सध्या 16 हजार 98  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 1 हजार 153  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 27 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील
जीवन ज्योती कॉलनी परिसरातील 51 वर्षीय पुरुष, 
नगीना बाग येथील 72 वर्षीय महिला, 
बालाजी वार्ड परिसरातील 83 वर्षीय महिला, 
तुकूम परिसरातील 48 वर्षीय पुरुष, 
बल्लारपूर तालुक्यातील 
53 व 60 वर्षीय महिला, 
राजुरा तालुक्यातील 
बामणवाडा येथील 34 वर्षीय पुरुष, 
वरोरा तालुक्यातील 
शेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, 
मूल तालुक्यातील 
45 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, 
कोरपना तालुक्यातील 
आवाळपूर येथील 58 वर्षीय पुरुष, 
सिंदेवाही तालुक्यातील 
लोणवाही येथील 78 वर्षीय पुरुष, 
नागभीड तालुक्यातील 
82 वर्षीय पुरुष, 
वणी-शिवपुर 
येथील 67 वर्षीय पुरुष, 
मारेगाव-यवतमाळ 
येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1036 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 957, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 30, यवतमाळ 33, भंडारा 10 , गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1508 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील  466, 
चंद्रपूर तालुका  152 , 
बल्लारपूर  127, 
भद्रावती  108, 
ब्रम्हपुरी  56, 
नागभिड  26, 
सिंदेवाही  42, 
मूल  76, 
सावली  42, 
पोंभूर्णा  03, 
गोंडपिपरी  37, 
राजूरा  52, 
चिमूर  49, 
वरोरा  118, 
कोरपना  119,  
जिवती  22 
इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.