गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यत 674 कोरोनामुक्त #ChandrapurDistrictCoronaUpdate

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यत 

674 कोरोनामुक्त

278 पॉझिटिव्ह 

09 मृत्यू

आतापर्यंत 76,157 जणांची कोरोनावर मात

ॲक्टीव पॉझिटिव्ह 4,222

चंद्रपूर, दि.26 मे : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 674 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 278 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 09 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 81 हजार 790 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 157 झाली आहे. सध्या 
4 हजार 222 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 62 हजार 220 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 77 हजार 508 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
👉🏻 चंद्रपूर शहरातील 
48 वर्षीय पुरुष, 
वरवट येथील 50 वर्षीय पुरुष, 
साखरवाही येथील 34 वर्षीय पुरुष. 
👉🏻 भद्रावती तालुक्यातील 
विजासन टेकडी परिसरातील 45 वर्षीय पुरुष. 
👉🏻 राजुरा तालुक्यातील 
70 वर्षीय पुरुष. 
👉🏻 कोरपना तालुक्यातील 
बाखर्डी येथील 65 वर्षीय महिला. 
👉🏻 मूल तालुक्यातील 
55 वर्षीय पुरुष. 
👉🏻 जिवती तालुक्यातील 
अासापूर येथील 65 वर्षीय पुरुष. 
👉🏻 ब्रह्मपुरी तालुक्यातील 
मालडोंगरी येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

  जिल्ह्यात आतापर्यंत 1411 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1307, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 278 रुग्णांमध्ये 
⏹️ चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 74, 
⏹️ चंद्रपूर तालुका 19, 
⏹️ बल्लारपूर 50, 
⏹️ भद्रावती 11, 
⏹️ ब्रम्हपुरी 11, 
⏹️ नागभिड 07, 
⏹️ सिंदेवाही 08, 
⏹️ मूल 18, 
⏹️ सावली 06, 
⏹️ पोंभूर्णा 02, 
⏹️ गोंडपिपरी 06, 
⏹️ राजूरा 10, 
⏹️ चिमूर 02, 
⏹️ वरोरा 28, 
⏹️ कोरपना 21, 
⏹️ जिवती 02 
⏹️ इतर ठिकाणच्या 03 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.