गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात ,993 कोरोनामुक्त, Corona

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 

993 कोरोनामुक्त, 

973 पॉझिटिव्ह 

22 मृत्यू

 आतापर्यंत 46,125 जणांची कोरोनावर मात

 ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,767

चंद्रपूर, दि. 3 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 993  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 973 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 63 हजार 868 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 46 हजार 125 झाली आहे. सध्या 16 हजार 767  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 87 हजार 23 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 18 हजार 795 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील 52 वर्षीय महिला, 
चंद्रपुर बालाजी वार्ड येथील 58 वर्षीय पुरुष, चंद्रपुर एकोरी वार्ड येथील 55 वर्षीय महिला, चंद्रपुर भिवापुर वार्ड येथील 52 वर्षीय महिला,  दुर्गापूर येथील 60 वर्षीय महिला, 
चंद्रपुर विठ्ठल मंदिर वार्ड येथील 60 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर 54 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर तुकुम येथील 61 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर नगीना बाग येथील 51 वर्षीय महिला. ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथील 65 वर्षीय पुरुष, 
नागभीड तालुक्यातील वाढोना येथील 35 वर्षीय महिला, 
नागभीड़ 45 वर्षीय पुरुष, 
मंगरूळ येथील 60 वर्षीय पुरुष
चिमूर तालुक्यातील 50 वर्षीय महिला, 
चिमुर 60 वर्षीय पुरुष
भद्रावती तालुक्यातील माजरी येथील 46 वर्षीय पुरुष
बल्लारपूर तालुक्यातील 72 वर्षीय महिला, 
बल्लारपुर 67 वर्षीय पुरुष
मूल तालुक्यातील केळझर येथील 70 वर्षीय पुरुष,
वणी-यवतमाळ येथील 57 वर्षीय पुरुष
भंडारा तालुक्यातील साकोली येथील 40 वर्षीय महिला
गडचिरोली येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 976 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 904, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 29, यवतमाळ 28, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 973 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 390,
चंद्रपूर तालुका 38, 
बल्लारपूर 81, 
भद्रावती 99, 
ब्रम्हपुरी 41, 
नागभिड 38, 
सिंदेवाही 25 , 
मूल 57, 
सावली 33, 
पोंभूर्णा 13, 
गोंडपिपरी 30, 
राजूरा 05, 
चिमूर 06, 
वरोरा 72, 
कोरपना 17,  
जिवती 10 
इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.