चंद्रपुर जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 200 ने जास्त, गत 24 तासात 355 कोरोनामुक्त, Chandrapur District Corona

चंद्रपुर जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 200 ने जास्त

❇️ गत 24 तासात  355 कोरोनामुक्त, 

❇️ 148 पॉझिटिव्ह  

❇️ 11 मृत्यू

चंद्रपूर, दि.2 जून : चंद्रपुर जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरेानाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या सातत्याने वाढतीवर आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे 207 ने जास्त आहे. जिल्ह्यात 355 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 148 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 11 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

आज ( दि. 2 जून ) एकूण 2615 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 148 पॉझिटिव्ह तर 2467 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 

आज बाधित आलेल्या 148 रुग्णांमध्ये 
▶️ चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 18, 
▶️ चंद्रपूर तालुका 17, 
▶️ बल्लारपूर 33, 
▶️ भद्रावती 13, 
▶️ ब्रम्हपुरी 2, 
▶️ नागभिड 5, 
▶️ सिंदेवाही 2, 
▶️ मूल 9, 
▶️ सावली 1, 
▶️ पोंभूर्णा 4, 
▶️ गोंडपिपरी 2, 
▶️ राजूरा 16, 
▶️ चिमूर 2, 
▶️ वरोरा 7, 
▶️ कोरपना 13, 
▶️ जिवती 2 
▶️ इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.  

आज मृत झालेल्यांमध्ये 
👉🏻 चंद्रपूर शहरातील 
सिद्धार्थनगर येथील 49 वर्षीय पुरुष, 
पद्मापूर येथील 53 वर्षीय महिला, 
नरेंद्र नगर वार्ड येथील 60 वर्षीय पुरुष, 
👉🏻 बल्लारपूर तालुक्यातील 
67 वर्षीय पुरुष, 
👉🏻 भद्रावती तालुक्यातील 
किल्ला वार्ड येथील 58 वर्षीय पुरुष, 
👉🏻 वरोरा तालुक्यातील 
27 वर्षीय पुरुष, 
54 वर्षीय पुरुष, 
👉🏻 मूल तालुक्यातील 
53 वर्षीय महिला, 
👉🏻 नागभीड तालुक्यातील 
किशोर नगर येथील 45 वर्षीय पुरुष, 
👉🏻 गोंडपिपरी तालुक्यातील 
करंजी येथील 75 वर्षीय पुरुष 
👉🏻 गोंदिया तालुक्यातील 
अर्जुनी मोरगाव येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 51 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 79 हजार 471 झाली आहे. सध्या 2 हजार 115 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 246 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 90 हजार 544 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1465 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1357, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 50, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.