नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई,26 मार्च (का. प्र.) : नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

कुठेही गर्दी होता कामा नये अशा सूचना

सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली.