चंद्रपूर जिल्ह्यात आज पर्यन्त चे सर्वाधिक जास्त रुग्ण 96 , आज 2 नागरिकांचा मृत्यु , एक बल्लारपुर आणि एक चामोर्शी , एकूण संख्या 1667

चंद्रपूर,26 अगस्त :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1667 झाली आहे. गेल्या 24 तासात 96 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1068 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 579 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 1067 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 20 सह एकूण 17 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नागरिकांनी परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आज 26 अगस्त रोजी दुपारी 12:30 वाजता बल्लारपुर राणी लक्ष्मी  वार्ड येथील रहवासी 55 वर्षीय महिला चे शासकीय महाविद्यालय येथे मृत्यु झाले आहे.   
तर दूसरी मृत्यु गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील 52 वर्षीय नागरिक यांचे शासकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे मृत्यु झाले आहे.