गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 1415 कोरोनामुक्त, #CoronaChandrapur

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 

1415 कोरोनामुक्त, 

1667  पॉझिटिव्ह 

28 मृत्यू

 आतापर्यंत 42,823 जणांची कोरोनावर मात

 ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,584

चंद्रपूर, दि. 30 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1415 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1667 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 60 हजार 312 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 42 हजार 823  झाली आहे. सध्या 16 हजार 584  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 76 हजार 722 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 11 हजार 662 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील रामनगर येथील 70 वर्षीय महिला व 74 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर छत्रपती नगर येथील 49 वर्षीय पुरुष, 37 व 61 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर विश्वकर्मा नगर येथील 52 वर्षीय महिला, चंद्रपुर म्हाडा कॉलनी परिसरातील 62 व 72 वर्षीय पुरुष,  
चंद्रपुर रयतवारी कॉलनी परिसरातील 43 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर इंदिरा नगर येथील 27 वर्षीय पुरुष, 
दुर्गापूर येथील 55 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर बाबुपेठ येथील 62 वर्षीय महिला, 
बोर्डा चंद्रपूर येथील 70 वर्षीय महिला,  
चंद्रपुर भिवापूर येथील 78 वर्षीय पुरुष.
 वरोरा तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, 
जिवती तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, 
चिमूर तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, 
खापरी येथील 76 वर्षीय महिला, 
मासळ येथील 50 वर्षीय पुरुष. 
नागभीड तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, 
तळोधी येथील 65 वर्षीय पुरुष, 
गडचांदूर येथील 58 वर्षीय पुरुष, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्या नगर येथील 75 वर्षीय महिला, 
राजुरा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, 
यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष व  65 वर्षीय महिला, 
भंडारा येथील 58 वर्षीय महिला, 
सावर्ला-पवनी येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 905 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 836, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1667 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 381, 
चंद्रपूर तालुका 81, 
बल्लारपूर 119, 
भद्रावती 177, 
ब्रम्हपुरी 69, 
नागभिड 88, 
सिंदेवाही 57, 
मूल 58, 
सावली 26, 
पोंभूर्णा 19, 
गोंडपिपरी 49, 
राजूरा 107, 
चिमूर 60, 
वरोरा 205, 
कोरपना 142,  
जिवती 11 
व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.