गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात महाविस्फोट 16 कोरोना बाधितन्चा मृत्यु , 640 नविन पॉझिटिव्ह Chandrapur Corona update

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात महाविस्फोट

 194 कोरोनामुक्त 

16 कोरोना बाधितन्चा मृत्यु

640 पॉझिटिव्ह 

आतापर्यंत 27,454 जणांची कोरोनावर मात

ॲक्टीव पॉझिटिव्ह 4657

चंद्रपूर, दि. 10 एप्रिल : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, 

तर 640 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 32 हजार 592 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 454 झाली आहे. सध्या 4657 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 98 हजार 710 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 60 हजार 434 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 

गडचांदूर येथील 39 वर्षीय पुरुष, 
चंद्रपूर शहरायच्या तुकुम येथील 55 वर्षीय पुरुष, ट्रेझरी कॉलनी येथील 87 वर्षीय महिला, 
चंद्रपुर बाबुपेठ येथील 55 वर्षे पुरुष, 
चंद्रपुर महाकाली वार्ड येथील 59 वर्षीय पुरुष, चंद्रपुर सिस्टर कॉलनी येथील 56 वर्षीय महिला, वोल्टास सागर कॉलनी, वरोरा येथील 58 वर्षीय पुरुष, 
नेताजी वार्ड चीमूर येथील 41 वर्षीय महिला, पांजरेपार चिमूर येथील 70 वर्षीय पुरुष, कृष्णानगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुष, बुटीबोरी नागपूर येथील 50 वर्षीय पुरुष, 
नागभीड येथील 73 वर्षीय महिला, 
हार्डोना ता. राजुरा येथील 37 वर्षीय पुरुष, 
राधे गाव तालुका गोंडपिंपरी येथील 45 वर्षीय पुरुष, नेहरू वार्ड चिमूर येथील 78 वर्षीय पुरुष व भद्रावती येथील 38 वर्षीय पुरुषाचा  समावेश आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 481 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 437, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 640 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 217, 
चंद्रपूर तालुका 28,  
बल्लारपूर 18, 
भद्रावती 73, 
ब्रम्हपुरी 41, 
नागभिड 11, 
सिंदेवाही 22, 
मूल 38, 
सावली 10, 
पोंभुर्णा दोन, 
गोंडपिपरी सात, 
राजूरा 25, 
चिमूर 46, 
वरोरा 51, 
कोरपना 26, 
जीवती 18 
व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.