गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 1603 कोरोनामुक्त #CoronaChandrapur

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 

1603  कोरोनामुक्त,

1311 पॉझिटिव्ह तर 

17 मृत्यू

आतापर्यंत 39,318 जणांची कोरोनावर मात  

ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,534

चंद्रपूर, दि. 27 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1311 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 17 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 55 हजार 680 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 39 हजार 318  झाली आहे. सध्या 15 हजार 534 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 64 हजार 93  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 29 हजार 59 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 51 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर दत्तनगर वार्ड येथील 62 वर्षीय महिला, चंद्रपुर स्वावलंबी नगर येथील 63 वर्षीय महिला, चंद्रपुर तुकूम येथील 60 वर्षीय महिला, 
चंद्रपुर पंचशील चौक परिसरातील 47 वर्षीय महिला, 
चंद्रपुरदादमहल वार्ड येथील 50 वर्षीय पुरुष, भेंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष
राजुरा तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, 
वरोरा तालुक्यातील जिजामाता वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, 
बोर्डा येथील 55 वर्षीय पुरुष, 
कळमगव्हाण येथील 30 वर्षीय पुरुष,
भद्रावती तालुक्यातील पंचशील नगर येथील27, 33 व 66 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला
गोंडपिपरी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष तर 
वणी-यवतमाळ येथील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 828 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 763, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1311 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 495, 
चंद्रपूर तालुका 116 
बल्लारपूर 44, 
भद्रावती 36, 
ब्रम्हपुरी 75, 
नागभिड 80, 
सिंदेवाही 72, 
मूल 46, 
सावली 20, 
पोंभूर्णा 11, 
गोंडपिपरी 23, 
राजूरा 40, 
चिमूर 35, 
वरोरा 68, 
कोरपना 122, 
जिवती 12 
व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.