गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 2001 कोरोनामुक्त Corona

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 

2001 कोरोनामुक्त, 

1160 पॉझिटिव्ह 

21 मृत्यू

आतापर्यंत 54,448 जणांची कोरोनावर मात

ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,010

चंद्रपूर, दि. 8 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2001 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1160 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 70 हजार 548 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 54 हजार 448 झाली आहे. सध्या 15 हजार 10 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 8 हजार 623 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 33 हजार 474 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील 
35, 52, 58, 69 वर्षीय पुरुष, 
70 वर्षीय महिला
कोतवाली वार्ड येथील 34 वर्षीय पुरुष, 
तुकुम येथील 58 वर्षीय पुरुष, 
कृष्णा नगर येथील 38 वर्षीय पुरुष.
वरोरा तालुक्यातील 
42, 57, 80 वर्षीय पुरुष. 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 
कुर्झा येथील 80 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 
18, 35 वर्षीय महिला.
नागभीड तालुक्यातील 
किरमिटी मेंढा येथील 60 वर्षीय पुरुष. 
गोंडपिपरी तालुक्यातील 
धरमपूर येथील 50 वर्षीय पुरुष, भंगाराम तळोधी येथील 55 वर्षीय पुरुष,  50 वर्षीय पुरुष. 
आरमोरी गडचिरोली 
येथील 70 वर्षीय महिला तर 
गोंदिया जिल्ह्यातील 
मोरगाव अर्जुनी येथील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1080 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 996, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 31, यवतमाळ 37, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया एक आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1160 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 373, 
चंद्रपूर तालुका 99 , 
बल्लारपूर 75, 
भद्रावती 91,
 ब्रम्हपुरी 49, 
नागभिड 19,
सिंदेवाही 46, 
मूल 54, 
सावली 46, 
पोंभूर्णा 04, 
गोंडपिपरी 09, 
राजूरा 73, 
चिमूर 47, 
वरोरा 86, 
कोरपना 57,  
जिवती 10 
इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.