972 कोरोनामुक्त,
553 पॉझिटिव्ह
11 मृत्यू
आतापर्यंत 70,987 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 7,391
चंद्रपूर, दि.20 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 972 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 553 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 11 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 79 हजार 703 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 70 हजार 987 झाली आहे. सध्या 7 हजार 391 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 47 हजार 79 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 64 हजार 465 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये
चंद्रपूर शहरातील
अंचलेश्वर गेट परिसरातील 70 वर्षीय पुरुष,
73 वर्षीय पुरुष,
भिवापूर वार्ड येथील 20 वर्षीय पुरुष.
घुगुस
येथील 52 वर्षीय पुरुष.
बल्लारपूर तालुक्यातील
45 वर्षीय पुरुष.
भद्रावती तालुक्यातील
76 वर्षीय पुरुष,
माजरी येथील 65 वर्षीय महिला.
मूल तालुक्यातील
45 वर्षीय पुरुष.
राजुरा तालुक्यातील
40 वर्षीय पुरुष.
ब्रह्मपुरी तालुक्यातील
खेड येथील 40 वर्षीय महिला.
पळसगाव येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 1325 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1228 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 44, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 553 रुग्णांमध्ये
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 207,
चंद्रपूर तालुका 46,
बल्लारपूर 32,
भद्रावती 43,
ब्रम्हपुरी 33,
नागभिड 13,
सिंदेवाही 20,
मूल 26,
सावली 08,
पोंभूर्णा 11,
गोंडपिपरी 07,
राजूरा 31,
चिमूर 11,
वरोरा 22,
कोरपना 33,
जिवती 03
व इतर ठिकाणच्या 07 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.