चंद्रपुर जिल्हा मोठी बातमी :चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय Chandrapur

चंद्रपुर जिल्हा मोठी बातमी :चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली, 

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 

अडीच हजार निवेदनं आली

मुंबई, 27 मे : अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. दारुबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारु विकली जात होती. दारुबंदी उठवण्याबाबत अडीच हजार निवेदनं आली. अवैध आणि बनावट दारु जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळे दारुबंदीचे दुष्परिणाम पाहायला मिळत होते. याबाबत एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीनं दारुबंदी उठवण्यात यावी असा अहवाल दिला होता. तो अहवाल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला. त्यानंतर एकमताने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.