चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना ने 3 मृत्यू ,46 नव्याने पॉझिटिव्ह #corona

गत 24 तासात 57 कोरोनामुक्त

46 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू

 आतापर्यंत 1,78,398 नमुन्यांची तपासणी 

 उपचार घेत असलेले बाधित 371  

चंद्रपूर, दि. 3 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 57 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

 तर 46 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 402 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 642 झाली आहे.

 सध्या 371 बाधितांवर उपचार सुरू आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 78 हजार 398 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 52 हजार 618 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या चोर खिडकी, जटपुरा गेट येथील 80 वर्षीय महिला, 

रामनगर येथील 82 वर्षीय पुरूष व 

सिंदेवाही येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 371 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 338, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 11, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 46 रुग्णांमध्ये
 चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 23, 
चंद्रपूर तालुका चार,  
 बल्लारपुर तीन, 
भद्रावती दोन, 
ब्रम्हपुरी दोन,
 सिंदेवाही एक,
 मुल दोन, 
सावली एक, 
गोंडपिपरी एक,
 राजुरा दोन,
 चिमुर दोन  व 
वरोरा एक, 
कोरपना एक व
 इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.