गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात1300 कोरोनामुक्त, Corona

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात

1300  कोरोनामुक्त,

1529 पॉझिटिव्ह 

 23 मृत्यू

 आतापर्यंत 37,715 जणांची कोरोनावर मात

  ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,843

चंद्रपूर, दि. 26 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1300 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1529 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 54 हजार 369 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 37 हजार 715  झाली आहे. सध्या 15 हजार 843 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 59 हजार 554  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 478 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील श्यामनगर परिसरातील 58 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर श्रीराम वार्ड येथील 47 वर्षीय पुरुष, चंद्रपुर इंदिरानगर येथील 65 वर्षीय महिला 
चंद्रपुर 67 वर्षीय पुरूष,
चंद्रपुर 50 वर्षीय पुरुष, 
वरोरा तालुक्यातील 58,
वरोरा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, 
वरोरा तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष, 
बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील 45 वर्षीय महिला, 
राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी वार्ड येथील 41 वर्षीय पुरुष, 
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील 65 वर्षीय पुरुष,
चिमूर तालुक्यातील बोथली येथील 37 वर्षीय महिला, 
खडसंगी येथील 70 वर्षीय पुरुष, 
भद्रावती तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, 
भद्रावती तालुक्यातील47 वर्षीय महिला, 
गोंडपिपरी तालुक्यातील 67 वर्षीय महिला व गोंडपिपरी तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्ड येथील 62 वर्षीय पुरुष, 
देलनवाडी येथील 65 वर्षीय पुरुष ,
गडचांदूर येथील 40 वर्षीय पुरुष, 
सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील 58 वर्षीय पुरुष, 
नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा तर गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 811 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 747, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1529 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 621, 
चंद्रपूर तालुका 61,  
बल्लारपूर 60, 
भद्रावती 138, 
ब्रम्हपुरी 112, 
नागभिड 27, 
सिंदेवाही 38, 
मूल 73, 
सावली 20, 
पोंभूर्णा 11, 
गोंडपिपरी 43, 
राजूरा 31,
चिमूर 73, 
वरोरा 120, 
कोरपना 59, 
जिवती 21 
व इतर ठिकाणच्या 21 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.