गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 631 कोरोनामुक्त 1213 पॉझिटिव्ह 22 मृत्यू corona update


गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 

631 कोरोनामुक्त 

1213 पॉझिटिव्ह 

22 मृत्यू

 आतापर्यंत 31281 जणांची कोरोनावर मात

 ॲक्टीव पॉझिटिव्ह 11541

चंद्रपूर, दि. 19 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 631 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1213 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43  हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11हजार 541 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 32 हजार 411  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 81 हजार 856 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील दादमहल वार्ड येथील 60 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर जे बी नगर येथील 75 वर्षीय महिला, 
चंद्रपुर पठाणपुरा वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, चंद्रपुर बाबुपेठ येथील 62 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर बालाजी वार्ड येथील 75 वर्षीय महिला, चंद्रपुर अंचलेश्वर वार्ड येथील 80 वर्षीय महिला, चंद्रपुर नगीना बाग येथील 50 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर जटपुरा गेट परिसर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तर भद्रावती येथील 69  वर्षीय पुरुष व 
भद्रावती 65 वर्षीय महिला
वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील 35 वर्षीय वरोरा खंबाड़ा पुरुष व 80 वर्षीय पुरुष. 
गडचांदूर येथील 56 वर्षीय पुरुष, 
ब्रह्मपुरी येथील विठ्ठल मंदिर वार्डातील 65 वर्षीय व ब्रह्मपुरी साईनगर येथील 65 वर्षीय पुरुष,
नागभीड येथील 45 वर्षीय पुरुष, 
चिमूर येथील 40 वर्षीय 60 वर्षीय व 
चिमुर 50 वर्षीय पुरुष, 
बल्लारपूर येथील 56 वर्षीय पुरुष, 
पांढरकवडा येथील 31 वर्षीय महिला, 
भंडारा येथील 50 वर्षीय महिलेचा 
समावेश आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 573, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा तिन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1213 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 302, 
चंद्रपूर तालुका 70, 
 बल्लारपूर 58, 
भद्रावती 86, 
ब्रम्हपुरी 148, 
नागभिड 25, 
सिंदेवाही 34, 
मूल 45,
 सावली 13, 
पोंभूर्णा 8, 
गोंडपिपरी 16, 
राजूरा 102, 
चिमूर 93, 
वरोरा 157, 
कोरपना 30, 
जीवती 13 व 
इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे