गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 743 कोरोनामुक्त 1425 पॉझिटिव्ह तर 16 मृत्यू #CoronaChandrapur

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात

 743  कोरोनामुक्त

 1425  पॉझिटिव्ह तर 

16 मृत्यू

 आतापर्यंत 32,024 जणांची कोरोनावर मात
 
ॲक्टीव पॉझिटिव्ह 12,207

चंद्रपूर, दि. 20 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 743 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1425 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 44  हजार 869 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 32 हजार 024 झाली आहे. सध्या 12हजार 207 बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

आतापर्यंत 3 लाख 37 हजार 064  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 85 हजार 107 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील 56 वर्षीय महिला,
चंद्रपुर 65 वर्षीय महिला, 
चंद्रपुर 58  वर्षीय पुरूष,
चंद्रपुर 76 वर्षीय पुरुष,
चंद्रपुर बाबुपेठ येथील 65 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर गजानन महाराज चौक परिसरातील 36 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर रहमत नगर येथील 62 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर तुकूम येथील 59 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर सिस्टर कॉलनी,नगीना बाग परिसरातील 55 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर सिव्हिल लाईन परिसरातील 41 वर्षीय पुरुष, 
ब्रह्मपुरी येथील 50 वर्षीय पुरुष,
सरदार पटेल वार्ड, वरोरा येथील 78 वर्षीय पुरुष, वणी-यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष, 
घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष,
बामणी येथील 45 वर्षीय महिला, 
भिसी-चिमूर येथील 45 वर्षीय 
पुरुषाचा समावेश आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 638 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 588, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा तिन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1425 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 445, 
चंद्रपूर तालुका 67,  
बल्लारपूर 104, 
भद्रावती 102, 
ब्रम्हपुरी 133,
नागभिड 42,
 सिंदेवाही 43,
 मूल 65, 
सावली 23, 
पोंभूर्णा 3, 
गोंडपिपरी 21, 
राजूरा 59, 
चिमूर 41, 
वरोरा 207, 
कोरपना 40, 
जिवती 16
व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे