गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 1044 कोरोनामुक्त Corona Chandrapur

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 

1044 कोरोनामुक्त, 

1458 पॉझिटिव्ह 

 25 मृत्यू

 आतापर्यंत 45,132 जणांची कोरोनावर मात

  ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,809

चंद्रपूर, दि. 2 मे : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 1044  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1458 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 25 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 62 हजार 895 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 45 हजार 132 झाली आहे. सध्या 16 हजार 809  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 84 हजार 693 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 16 हजार 906 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील  सरकार नगर येथील 73 वर्षीय पुरुष, कृष्णानगर येथील 38 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 43 व 63 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील संतोषीमाता वार्ड येथील 54 व 73 वर्षीय पुरुष, विसापूर येथील 75 वर्षीय महिला,42 वर्षीय पुरुष.
राजुरा तालुक्यातील 64 वर्षीय पुरुष, धानोरा येथील 62 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील 41 वर्षीय महिला.
 वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, विनायक लेआउट परिसरातील 51 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 58 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष.  ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर परिसरातील 78 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, टिळक नगर येथील 45 वर्षीय महिला.  चिमूर तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 954 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 884, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 28, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1458 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 352, चंद्रपूर तालुका 84, बल्लारपूर 87, भद्रावती 110, ब्रम्हपुरी 66, नागभिड 25, सिंदेवाही 99 , मूल 79, सावली 49, पोंभूर्णा 21, गोंडपिपरी 42, राजूरा 52, चिमूर 57, वरोरा 203, कोरपना 118,  जिवती 00 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.