गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 1092 कोरोनामुक्त, Corona

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 

1092 कोरोनामुक्त, 

1170 पॉझिटिव्ह 

 22 मृत्यू

 आतापर्यंत 47,217 जणांची कोरोनावर मात

  ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,823

चंद्रपूर, दि. 4 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1092  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1170  कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 65 हजार 38 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 47 हजार 217 झाली आहे. सध्या 16 हजार 823  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 91 हजार 838 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 21 हजार 634 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 48 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर पठाणपुरा परिसरातील 50 वर्षीय पुरुष, चंद्रपुर गांधी चौक येथील 85 वर्षीय महिला, 
चंद्रपुर विठ्ठल मंदिर वार्ड परिसरातील 72 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर 47, 50 व 62 वर्षीय महिला, 
चंद्रपुर 60 वर्षीय पुरुष.
वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड परिसरातील 55 वर्षीय पुरुष,
वरोरा 50 वर्षीय पुरुष
भद्रावती तालुक्यातील गुरु नगर येथील 54 वर्षीय महिला
कोरपना तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष
गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील 42 वर्षीय पुरुष
नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 35 वर्षीय पुरुष, 
धामणगाव येथील 65 वर्षीय महिला
ब्रह्मपुरी तालुक्यातील नवरगाव येथील 37 वर्षीय पुरुष
सिंदेवाही तालुक्यातील 43 वर्षीय पुरुष
चिमूर तालुक्यातील कोलारी येथील 50 वर्षीय महिला, 
पाचगाव येथील 55 वर्षीय महिला, 
वडाला पैकु येथील 53 वर्षीय पुरुष, 
राजुरा तालुक्यातील रामपूर येथील 77 वर्षीय पुरुष
वणी-नायगाव येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 998 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 925, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 29, यवतमाळ 29, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1170 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 461, 
चंद्रपूर तालुका 82, 
बल्लारपूर 42, 
भद्रावती 22, 
ब्रम्हपुरी 51, 
नागभिड 65, 
सिंदेवाही 77 , 
मूल 24, 
सावली 07, 
पोंभूर्णा 29, 
गोंडपिपरी 31, 
राजूरा 76, 
चिमूर 36, 
वरोरा 36, 
कोरपना 112,  
जिवती 02 
 इतर ठिकाणच्या 17 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.