गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 1462 कोरोनामुक्त, Corona

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात

1462  कोरोनामुक्त,

 1393 पॉझिटिव्ह 

 23 मृत्यू

 आतापर्यंत 48,679 जणांची कोरोनावर मात

ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,731

चंद्रपूर, दि. 5 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1462 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1393 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 66 हजार 431 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 48 हजार 679 झाली आहे. सध्या 16 हजार 731 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 96 हजार 966 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 25 हजार 332 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये 
चंद्रपूर शहरातील 
हनुमान नगर तुकुम परिसरातील 70 वर्षीय पुरुष, 
ऊर्जानगर येथील 40 वर्षीय पुरुष, 
चंद्रपुर रामनगर परिसरातील 66 वर्षीय पुरुष, 
65 वर्षीय महिला, 
46, 58  व 62 वर्षीय पुरुष, 
55 व 72 वर्षीय महिला, 
मारेगाव येथील 45 वर्षीय महिला, 
घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष. 
राजुरा तालुक्यातील 
40 वर्षीय महिला, 
वरोरा तालुक्यातील 
45 वर्षीय पुरुष, 
बल्लारपूर तालुक्यातील 
60 वर्षीय महिला, 
चिमूर तालुक्यातील
84 वर्षीय पुरुष, व्याहाड येथील 74 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 
53 व 81  वर्षीय पुरुष,  
नागभीड तालुक्यातील 
खैरी येथील 55 वर्षीय पुरुष, 
गोंडपिपरी तालुक्यातील 
42 व 56 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला,
वणी- यवतमाळ येथील 12 वर्षीय मुलीचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1021 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 944, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 30, यवतमाळ 31, भंडारा 10 , गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1393 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 415, 
चंद्रपूर तालुका 69, 
बल्लारपूर 134, 
भद्रावती 106, 
ब्रम्हपुरी 60, 
नागभिड 41, 
सिंदेवाही 56 , 
मूल 91, 
सावली 41, 
पोंभूर्णा 07, 
गोंडपिपरी 34, 
राजूरा 25, 
चिमूर 62, 
वरोरा 168, 
कोरपना 61,  
जिवती 13 
 इतर ठिकाणच्या 10 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.