❇️ 571 कोरोनामुक्त,
❇️ 220 पॉझिटिव्ह
❇️ 12 मृत्यू
❇️ आतापर्यंत 76,728 जणांची कोरोनावर मात
❇️ ॲक्टीव पॉझिटिव्ह 3,859
चंद्रपूर, दि.27 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 571 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 220 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 12 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 10 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 728 झाली आहे. सध्या
3 हजार 859 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 63 हजार 698 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 78 हजार 862 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये
👉🏻 चंद्रपूर शहरातील
दाताळा येथील 62 वर्षीय पुरुष,
51 व 55 वर्षीय पुरुष,
पडोली येथील 65 वर्षीय पुरुष.
👉🏻 भद्रावती तालुक्यातील
46 व 65 वर्षीय महिला.
👉🏻 बल्लारपूर तालुक्यातील
65 वर्षीय पुरुष.
👉🏻 नागभीड तालुक्यातील
जनकापूर येथील 65 वर्षीय महिला,
55 वर्षीय महिला.
👉🏻 राजुरा तालुक्यातील
28 वर्षीय महिला.
👉🏻 पोंभुर्णा तालुक्यातील
आष्टा येथील 65 वर्षीय महिला.
👉🏻 गडचांदूर येथील
63 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 1423 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1319, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 220 रुग्णांमध्ये
❎ चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 56,
❎ चंद्रपूर तालुका 17,
❎ बल्लारपूर 27,
❎ भद्रावती 37,
❎ ब्रम्हपुरी 03,
❎ नागभिड 02,
❎ सिंदेवाही 10,
❎ मूल 14,
❎ सावली 05,
❎ पोंभूर्णा 08,
❎ गोंडपिपरी 13,
❎ राजूरा 02,
❎ चिमूर 01,
❎ वरोरा 08,
❎ कोरपना 15,
❎ जिवती 01
❎ इतर ठिकाणच्या 01 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.